शनिवार, २८ मार्च, २००९
पृथ्वीला मत द्या
सर्व मित्रांना माझा सप्रेम नमस्कार,
आज जगभरात जो सर्वात महत्त्वाचा उपक्रम राबविला जाणार आहे, त्याविषयी मी आपल्या बरोबर काही संवाद साधू इच्छितो. हा उपक्रम म्हणजे '६० अर्थ अवर' (पृथ्वीचा तास) होय.
ह्या वर्षी, 'अर्थ अवर' (पृथ्वीचा तास) हा उपक्रम पहिल्या 'जागतिक मतदान' यामध्ये रूपांतरित झाला आहे. ही लढत पृथ्वी आणि जागतिक तापमानवाढ या दोघांमध्ये होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच सर्व वयाच्या, सर्व राष्ट्रांच्या, सर्व जातींच्या व सर्व वर्गांच्या लोकांना आपल्या दिव्याच्या कळीच्या (बटणाच्या) द्वारे मतदान करायची संधी प्राप्त झाली आहे - आपला दिवा बंद करुन पृथ्वीला मत द्या किंवा त्याला चालु ठेवून जागतिक तापमान वाढीला मत द्या.
'६० अर्थ अवर' हा कार्यक्रम WWF (वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर किंवा वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड) ह्या संस्थेने आयोजित केला आहे. डिसेंबर २००९ मध्ये जागतिक हवामानाबद्दल आयोजित केलेल्या वाटाघाटींमध्ये काही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जाणार आहेत. ह्या कारणाने २००९ वर्ष आणीबाणीचे ठरणार आहे. 'अर्थ अवर' (पृथ्वीचा तास) हा उपक्रम लोकांचा आवाज आधोरेखित करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला असून, त्याद्वारे लोक नेत्यांना प्रत्यक्ष आज्ञा करतील. ह्या उपक्रमाद्वारे एखादे अर्थपूर्ण धोरण आखले जाण्याची अपेक्षा आहे.
अर्थ अवर हा उपक्रम सर्वप्रथम २००७ साली, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे हाती घेण्यात आला. त्यावेळेस घर व उद्योग मिळून २२ लाख ठिकाणी एक तासासाठी दिवे बंद ठेवण्यात आले. २००८ साली हा संदेश एक जागतिक चळवळीत परावर्तित झाला, ज्याद्वारे ५ कोटी लोकांनी आपले दिवे बंद ठेवले. आता २००९ मध्ये भारत प्रथमच अर्थ अवर ह्या चळवळीत सहभागी होत आहे. दिल्ली व मुंबई ही शहरे जगभरातील ८० देशांमधील ८२५ शहरांमध्ये आहेत, ज्यांनी अर्थ अवर दरम्यान 'पृथ्वीला मत' देण्याची शपथ घेतली आहे. हा आकडा दर दिवसाबरोबर वाढतच आहे. पुण्यातुनदेखिल माझे बरेच मित्र ह्या उपक्रमात सक्रीयपणे सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान हा भारतात ह्या उपक्रमाला प्रसिद्धी देणार आहे. HP, HSBC आणि Wipro यांसारख्या भरपूर औद्योगिक संस्थादेखिल ह्यात सहभागी होणार आहेत.
२००९ साली 'अर्थ अवर' ह्याला एका नवीन उंचीवर नेण्यात येणार आहे, ज्यात १०० कोटी लोक सहभागी होऊन एका जागतिक मताचा भाग म्हणुन आपले दिवे बंद ठेवतील अशी अपेक्षा आहे. इतिहासातील इतर कोणत्याही मतदानासारखे तुम्ही कोणत्या देशाचे आहात हे महत्त्वाचे नसून ह्या वेळेस तुम्ही कोणत्या ग्रहावरचे आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. वोट अर्थ (पृथ्वीला मत) हा एक जागतिक आवाज असून तो प्रत्येक माणूस, उद्योग आणि समाजासाठी आहे. उभे राहून आपल्या भविष्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांना दिलेला एक आवाज.
आपल्या प्रत्येकाकडे एक मत आहे आणि प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. पुढील पिढीसाठी आपण प्रत्येकजण एकत्र येऊन आपल्या ग्रहाचे नियंत्रण मिळवू शकतो.
२८ मार्च रोजी, शनिवारी, रात्री ८.३० ते ९.३० या आपल्या स्थानिक वेळेत फक्त एक तासाकरीता आपले दिवे बंद ठेऊन आपण पृथ्वीला मत देऊ शकता.
ह्या गंभीर विषयामध्ये आपली उत्सुकता दाखविण्यासाठी आपले आभार. मी अशी आशा करतो की आपण सर्वजण मिळून आपली ही सुंदर पृथ्वी पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेऊ.
मी आपणा सर्वांना अशी विंनती करतो की आपण कृपया पुढील Link वर भेट द्यावी, ज्यावर आपल्याला अधिक माहिती आणि प्रत्येक दिवशी इंधन बचत कशी करावी याबद्दलचे काही उपाय देण्यात आले आहेत :
1. http://www.earthhour.org/
2. http://earthhour.in/
3. http://en.wikipedia.org/wiki/Earth_Hour
शुक्रवार, २७ मार्च, २००९
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !!!!
नमस्कार मित्रांनो,
आज मी तुम्हाला गुढी पाडवा ह्या सणाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. हा सण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
गुढी पाडवा हा पहिला धार्मिक सण आहे ज्याने हिंदूंच्या नवीन वर्ष, नवीन महिना आणि नवीन दिवसाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू चांद्र-संवत्सरानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेला येतो. हा सण वसंत ऋतूची सुरुवात म्हणून मानला जातो. ग्रेगोरियन कालनिर्णयानुसार हा दिवस मार्च महिन्याचा शेवट व एप्रिल महिन्याची सुरुवात यांमधल्या काळात येतो. हा हिंदू चांद्र-संवत्सरानुसार साडे-तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, ज्याचा प्रत्येक क्षण हा नवीन कार्यासाठी शुभ मानला जातो.
ह्याच दिवशी ब्रह्मदेवानी ब्रम्हांडाची रचना केली. ह्या कारणाने हिंदूंसाठी हा दिवस खास महत्त्वाचा असतो. ह्या दिवशी सर्वप्रथम अभ्यंगस्नान करतात, दरवाज्याला तोरण बांधून सजवतात, पूजा-अर्चना करुन मग गुढी उभारतात. गुढी विजयाचे निशाण आहे. देवाच्या विविध गुणधर्मांपैकी 'विजय प्राप्त केलेला' हा एक गुण आहे आणि त्याने अनेक ठिकाणी प्राप्त केलेल्या विजयांचे हा गुण प्रतिक आहे. हे दर्शविण्यासाठी गुढी उभारली जाते. गुढी घराच्या मुख्य दरवाज्यावर उभारतात. ह्यासाठी निवडलेली जागा ही उजव्या बाजूस (घरातून बघितले असता) असावी. उजवी बाजू आत्म्याच्या उत्साही स्थितीची दर्शक आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी अग्नि (तेज) तत्व व प्रजापति (नवनिर्माण) तत्व या दोहोंनी भरलेल्या लहरी मोठया प्रमाणात सक्रिय होतात. जर ह्या दैवी चेतनेला सुर्योदयासमायी आत्मसात केले, तर ती जास्त काळासाठी टिकते. ही चेतना शरीरातील पेशींमध्ये साठविली जाते आणि जशी गरज पडेल तशी ती वापरली जाते. वरील कारणाने असे मानले जाते की सूर्योदयानंतर ५ - १० मिनिटांमध्ये गुढीची पूजा-अर्चना करावी.
प्रसाद म्हणून कडूलिंबाची पाने गुळाबरोबर दिली जातात. ह्या सणासाठी खास जेवण तयार केले जाते, उदा., श्रीखंड-पुरी किंवा पुरणपोळी इ.
तर मित्रांनो, माझ्याकडून तुम्हा सर्वांना
"गुढी पाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा"
गुरुवार, २६ मार्च, २००९
प्रत्येक नव्या सुर्योदयाबरोबर, आपली एक नवी सुरुवात
नमस्कार मित्रांनो,
हे माझे पहिले Blog Post आहे. मला माहिती आहे की हे चित्र अस्पष्ट आहे आणि तुमच्यापैकी बरेच लोक असा विचार करत असतील की मी हे चित्र का वापरले. ह्यासाठी मी पुढील कारण देइन: हे दृश्य ' हिकुरांगी ' पर्वतावरील सुर्योदयाचे आहे.
ज्या लोकांना माझे उत्तर समजले असेल, त्या सर्वांच्या सामान्य ज्ञानाची मी प्रशंसा करतो. पण तुमच्यापैकी ज्यांना हिकुरांगी पर्वताबद्दल काहीही माहिती नाही, अशांसाठी हे पुढील वर्णन :
हिकुरांगी पर्वत (किंवा टे अरा की हिकुरांगी) हे न्यूझिलैंड देशाच्या उत्तर बेटांमधील उत्तर-पूर्व बाजूचे १७५४मीटर (५७५५ फुट) ऊंच शिखर आहे. हे ठिकाण ईस्ट केपच्या ६० किलोमीटर (३७ मैल) दक्षिण-पश्चिम बाजूला आहे. हे शिखर उत्तर बेटाचे ज्वालामुखी नसलेले सर्वात ऊंच ठिकाण आहे.
आहे की नाही हे गमतीशीर? नाही, गमतीदार गोष्ट हि आहे की ह्या शिखरावर नवीन दिवसाच्या सुर्याची किरणे सर्वप्रथम पडतात. फिजी आणि टोंगा हे प्रदेश ह्या ठिकाणच्या उत्तरेला असल्यामुळे वरिल विधान पूर्णपणे खरे नाही. दक्षिण गोलार्धातील उन्हाला सोडल्यास इतर कोणत्याही वेळेस हे विधान तर नक्कीच लागू होत नाही. मात्र उन्हाळ्यात पृथ्वीच्या अंशाच्या कलनाने हिकुरांगी पर्वतावर सूर्यकिरणे ह्या प्रदेशांपेक्षा लवकर पडतात. तरीही इथे ती चाथम बेट (किंवा अंटार्कटिका) पेक्षा लवकर पोहचत नाहीत. शिवाय उन्हाळ्याच्या मध्यात सुद्धा दक्षिण बेटांवर असलेल्या काही दक्षिण-पूर्व टेकडयांवर सूर्यकिरणे काहीशी लवकर पडतात. हे सर्व जरी खरे असले तरीही नवीन वर्षाच्या स्वागतसमायी ह्या पर्वताला एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते.
न्यूझिलैंड हा देश नवीन दिवस पाहणारा जगातील सर्वप्रथम प्रदेशांपैकी एक आहे. हा देश GMT
(ग्रीनविच मिन टाइम) ह्या वेळ क्षेत्राच्या १२ तास पुढे आहे.
ह्या कारणाने मी असा विचार केला की माझी पहिली Post हि ह्या विषयावर असेल. तुम्हा सर्वांना ही पोस्ट आवडेल अशी मी आशा करतो. तुम्ही यापुढेही माझ्या Blog ला भेट द्याल याचाही मला विश्वास आहे. माझ्या कोणत्याही Post वर आपण आपले मत किंवा सूचना जरुर द्या. त्याची मला भविष्यात सुधारणा करायला नक्कीच मदत होईल.
अधिक माहितीसाठी ह्या Link वर भेट द्या :
1. http://www.doc.govt.nz/templates/PlaceProfile.aspx?id=34830
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझ्याबद्दल
- केतन देशपांडे
- नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉग साईट वर आपले स्वागत आहे. माझे वय 21 वर्ष असून मी पुण्याचा आहे. मी इलेक्ट्रानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आभियांत्रिक आहे. मी आशा करतो की तुम्हा सर्वांना माझा हा ब्लॉग आवडेल. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!!! आपला दिवस चांगला जावो !
फॉलोअर
ब्लॉग संग्रहण
ब्लॉग भेटिंचा आकडा
ब्लॉग बद्दलचे तुमचे मत
Ketan's Google Search Engine
Custom Search